मुख्तार आली आणि फारुख खान या दोघांना विनायक शिरसाट यांच्या खून प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी त्यांचाच मित्र वर्मा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा – पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
विनायक यांचे वडील सुधाकर शिरसाट यांना विनायक यांच्याच चालकाने फोन करून पंधरा लाख रुपये मागितले होते. त्याला त्यांनी सविस्तर विचारल्यावर चालकाला विनायक यांनी फोन करून वडीलांकडून पंधरा लाख रुपये घेऊन येण्याचे सांगितले. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु फोन बंद होता. त्यानंतर त्यांच्या जवळच्या एका मित्रालाही त्यांनी फोन केला परंतु तोही बंद होता. तर त्यांची कार जांभूळवाडी येथे एका बांधकाम साईटसमोर लॉक करून पार्क केलेल्या अवस्थेत मिळाली.
३१ जानेवारी रोजी त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ते बेपत्ता असल्याची तक्रार केली होती, मात्र प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी ५ फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर यासंदर्भात त्यांनी वारंवार पोलिसांकडे पाठपुरावा केला. परंतु पोलिसांकडून केवळ आमच्या पद्धतीने तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. तर मंगळवारी त्यांचा निर्घृणपणे खून करून मृतदेह अपहरणकर्त्यांनी लवासा रोडवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येचा रिपब्लीकन मातंग सेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.