आठ दिवसांमध्ये निघणार शिक्षक भरतीची पहिली जाहिरात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या आठ दिवसांमध्ये पंधरा जिल्ह्यांमधील शिक्षक भरतीची पहिली जाहिरात काढली जाईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केले आहे. पुण्यात अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या (पात्र) उमेदवारांनी अभियोग्यता चाचणी डिसेंबर महिन्यात झाली असून अद्यापही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही यामुळे आंदोलन सुरु केले होते. यापार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी ही घोषणा केली आहे.

डिसेंबर महिन्यात अभियोग्यता चाचणी झाली होती, मात्र अद्यापही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. याचा निषेध म्हणून अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण झालेल्या (पात्र) उमेदवारांनी पुण्यात आंदोलन सुरु केले होते. दरम्यान यापार्श्वभूमीवर सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांची जाहिरात काढली जाणार आहे. जाहिरातीनंतरच्या पंधरा दिवसांत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच या भरतीदरम्यान संस्थाचालक घेत असलेल्या प्रत्येक मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील केले जाईल. असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, यादरम्यान भरती प्रक्रिया का रखडली असा प्रश्न त्यांना विचारला असता, संस्था चालकांमुळे भरती प्रक्रिया इतके दिवस रखडली होती. संस्था चालकांनी याचिका दाखल केल्यामुळे अनेक अडथळे निर्माण झाले होते. भरती प्रक्रियेत आम्ही केलेल्या नव्या बदलांमुळे संस्थाचालकाला शिक्षक भरतीदरम्यान एकही रुपया घेता येणार नाही. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आगामी निवडणुकांचा विचार करुन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असेही त्यांनी म्हंटले. विशेष म्हणजे, शिक्षक भरती लवकर पूर्ण व्हावी यासाठी पात्र उमेदवारांनी पुणे, नंदूरबारसह अनेक ठिकाणी आंदोलन सुरु केली आहेत.

दरम्यान विनोद तावडे म्हणाले की, आगामी निवडणुकांचा विचार करुन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान शिक्षक भरती लवकर पूर्ण व्हावी यासाठी पात्र उमेदवारांनी पुणे, नंदूरबारसह अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे.