शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचे दिसले परंतु केंद्रीय कृषि कार्यालयाकडून अजूनही याबाबत अधिकृत पत्र मिळाले नाही असे अण्णांनी सांगितले. शिवाय केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. इतकेच नाही तर, दोन दिवसानंतर मौन आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. जर सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर, निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अण्णांनी दिल्याचे दिसून आले.
आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याने उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मंगळवारी अण्णांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन अण्णांनी आपलं उपोषण सोडलं. अण्णा हजारे यांनी सात दिवसांच्या उपोषणानंतर आंदोलन मागे घेतले. सरकारकडून उपोषण सोडताना लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्याचं केल्याचं सांगण्यात आलं.