गुरुवारी २१ फेब्रुवारी पासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. आर्ची हि कला शाखेची बहिस्थ विद्यार्थीनी आहे. तिने कला शाखेचे इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र व भूगोल हे विषय निवडले आहेत. माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावात जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयात तिने परीक्षेसाठीचे केंद्र निवडले आहे. याच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परीक्षा केंद्राला पोलीस संरक्षण मागितले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री गवळी सातपुते यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अर्ज करून पोलीस संरक्षण मागितले आहे.
हेही वाचा – म्हणे महाराष्ट्रात गुटखा बंदी ! बोरी गावात १ कोटीचा गुटखा जप्त
दरम्यान आर्चीने याआधी बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून १० वीची परीक्षा दिली आहे. तेव्हा तिला ६६.४० टक्के गुण मिळाले होते. तेव्हा तिचे परीक्षा केंद्र माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे आले होते.