‘बाळासाहेब ठाकरेंनीच केली आनंद दिघेंची हत्या’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवले असा घणाघाती आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे नवीन वादाला तोंड फुटू शकते.रत्नागिरी येथे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना त्यांनी हे विधान केले आहे.

इतकेच नव्हे तर कर्जतच्या फार्म हाऊसवरही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून दोन शिवसेनेच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असेही ते म्हंटले. याचबरोबर आनंद दिघेंचे खरे काय झाले? कट कसा रचला गेला आणि त्यांचे मरण हे हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. आणि हे दोन शिवसैनिकांना सहन झाले नाही. त्या शिवसैनिकांना ठार मारायाचा बाळासाहेबांनी कुणाला आदेश दिला आणि ते ठार झाले सुद्धा. ती केस दाबली गेली. जे दिघेसाहेबांबद्दल झाले, ते चुकीचे वाटले शिवसैनिकांना म्हणून बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन त्या दोघांना ठार मारले गेले. असा आरोपही त्यांनी केला.

विशेष म्हणजे, राणेसाहेबांनी, आम्ही आजपर्यंत एक मर्यादा पाळली. आम्ही कधीच बाळासाहेबांबद्दल बोललो नाही. बाळासाहेबांनी काय काय केले, त्याबद्दल कधी बोललो नाहीत. कारण आम्हाला आमची मर्यादा माहित होती. आणि आमचे राणेसाहेब बाळासाहेबांवर आजही एवढे प्रेम करतात, की त्यांना ते कधी सांगता आले नाही. मात्र एक मुलगा म्हणून, मी त्यांना साहेब जरी म्हणत असलो, तरी ते आधी माझे वडील आहेत. त्यांचा जाहीर कार्यक्रमात कुणी अपमान करत असेल, तर बाळासाहेब ठाकरेंची खरी परिस्थिती मला सर्वांना सांगावी लागेल.असेही ते म्हंटले.

इतकेच नव्हे तर आजपर्यंत मी मर्यादा ठेवली, कुणी खालच्या दर्जाचा माणूस जर राणेसाहेबांबद्दल खालच्या पातळीची टीका करत असेल, तर मी सहन करणार नाही. राणेसाहेब माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.  बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत. असेही ते म्हंटले. याचबरोबर जेवढी मर्यादा आम्ही ठेवली होती, ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर ठेवली नाही.  विनायक राऊतांनी मर्यादा ठेऊन बोलायला पाहिजे होते.

निलेश राणे इतक्यावरच न थांबता बाळासाहेब ठाकरेंना आनंद दिघेंनंतर सुप्रसिद्ध गायक सोनू निगमलाही ठार मारायचे होते. सोनू निगमला ठार मारायचे अनेकवेळा  प्रयत्नही झाले. असेही ते म्हंटले. इतकेच नव्हे तर, सोनू निगमला तुम्ही विचारा, बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन कुठे कुठे त्यांना ठार मारायला शिवसैनिक गेले होते. आज ते सांगतीलही. कदाचित घाबरले असतील, मात्र, आज बाळासाहेब नाहीत, तर सांगतीलही. असेही ते म्हणले. याचबरोबर सोनू निगमचे आणि ठाकरे घराण्याचे काय नाते होते हे मला सांगायला लावू नका. असेही ते म्हंटले.

इतकेच नव्हे तर जर माझे तोंड उघडायला लावाले,  तर बाळासाहेब ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कुणा-कुणाचे मृत्यू झाले.  कोण कोण गेले होते कर्जतच्या फार्म हाऊसवर. हे सगळे मी जाहीर सभे मध्ये सांगेन.असेही ते म्हंटले. याचबरोबर आमच्या नादाला लागायचे नाही. राणे म्हणतात आम्हाला. असेही ते म्हणले. तसेच . बाळासाहेबांबद्दल आजपर्यंत राणेसाहेब कधीही बोलले नाहीत. आम्हाला बाळासाहेबांचा मानसन्मान आहे. आणि त्यांचा मानसन्मान ठेवलाच पाहिजे. मात्र राणेसाहेबांबदल बाळासाहेब बोलत होते, ते आम्हाला चालत होते. आम्हाला काही फरकही पडत नव्हता. मात्र राणेसाहेबांबद्दल गल्लीबोळातले गटरछाप ( विनायक राऊत )  नेते बोलायला लागले, तर आम्ही सहन करणार नाहीत. असेही ते म्हंटले.