बर्थ डे स्पेशल – बॉलिवूड चा ‘ग्रिक गॉड’ हृतिक रोशन बद्दल या गोष्टी माहीत आहे का ?

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. लाखो-करोडो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हृतिकने आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. आज तो ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी…
बॉलिवूड चा ‘ग्रिक गॉड’ म्हणूनही ओळख असणारा . हृतिक रोशन याचे खरे नाव हृतिक राकेश नागरथ असे आहे. बालपणीच त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. १९८० मध्ये जितेंद्र यांच्या ‘आशा’ या चित्रपटात तो बालकलाकाराच्या रूपात दिसला होता. दोन दशकांपासून तो बॉलिवूडमध्ये चित्रपट साकारत आहे.
हृतिकला बालपणी बोलताना अडखळण्याचा आजार होता. अनेक वेळा त्याचे वडील राकेश रोशन त्याला यासाठी रागवत असत. ते त्याला म्हणायचे, ‘जर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करायची असेल, तर तुला या आजारावर मात करावाच लागेल’. हृतिकने नंतर यासाठी बरीच मेहनत घेतली आणि त्याने या आजारावर मात केला.

हृतिक रोशनला लहानपणी ‘मधुबाला’ आणि ‘परवीन बाबी’ आवडत होत्या. तसेच हृतिक हा ‘धर्मेंद्र’ यांचा खूप मोठा चाहता आहे. लहानपणे त्याच्या रूममध्ये धर्मेंद्र यांचे पोस्टर लावलेले असायचे.

१९८६ मध्ये ‘भगवान दादा ‘चित्रपटात त्याचा रोल मोठा होता. या चित्रपटात तो सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत दिसला होता. या चित्रपटात त्याने रजनीकांत यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.
वडील राकेश रोशन यांच्या चित्रपटात हृतिक कॅमेरा घेऊन वाटेल ते शूट करायचा पण त्याला अभिनयात जास्त रुची असायची आणि तो सतत आरश्यासमोर उभे राहून ऍक्टिंग करायचा.
राकेश रोशन यांना ‘कहो ना प्यार है’ चित्रपटात शाहरुखला घ्यायचे होते परंतु शाहरुखला चित्रपटाची स्टोरी आवडली नाही. मग राकेश रोशन यांनी हृतिक याला चित्रपटात घेतले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि यामुळे हृतिक रातोरात स्टार झाला.
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की हृतिकच्या हाताला दोन अंगठे आहेत. आणि त्यामुळेच ‘कोई मिल गया’ या चित्रपटात ‘जादू’ नावाच्या एलियनला सुद्धा दोन अंगठेदाखवण्यात आले आहे.

आपल्या अभिनयाने आणि गुड लूक्समुळे मुलींमध्ये अधिक लोकप्रिय असल्याने हृतिकला एकदा वैलेंनटाइन डे च्या दिवशी ३० हजार लग्नाचे प्रस्तावही आले होते.

अनेक लोकांप्रमाणे हृतिक सुद्धा चेन स्मोकर होता परंतु त्याने  ‘हाऊ टू स्टॉप स्मोकिंग’ नावाचे पुस्तक वाचून त्याने सिगरेट पिणे सोडले.

हृतिक तब्येतीने खूप किरकोळ होता सलमान खानने सांगितल्या नंतर त्याने आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले.आणि जिमला जाण्यास सुरुवात केली. जेव्हा हृतिकचा ‘गुजारिश’ चित्रपट रिलीज झाला तेव्हा सलमान या चित्रपटाबद्दल असे म्हणाला की. हा चित्रपट बघायला कोण कुत्र सुद्धा जाणार नाही तेव्हा या गोष्टीचा हृतिकला राग आला आणि तेव्हा पासून या दोघांमध्ये दरी निर्माण झाली.
हृतिक रोशन अभिनेता उदय चोपडा याला आपला चांगला मित्र मानतो कारण हे दोघेही एकाच शाळेत होते.
हृतिकने सुझैन खानसोबत २००० लग्न केले होते. लग्नाच्या आगोदर सुझैन आणि हृतिक चार वर्ष नात्यामध्ये होते मात्र, त्यांचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. त्याला दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मुलांसोबत ते नेहमी एकत्र वेळ घालवताना दिसतात. त्या दोघांनी पून्हा एकत्र यावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. खुद्द सुझैनचे वडील संजय खान यांनीही इच्छा व्यक्त केली होती.
हृतिकचे गाजलेले चित्रपट
२००२ साली हृतिकने आजपर्यंतर ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि ‘क्रिश-३’,’जोधा-अकबर’,’काबिल ‘यांसारखे हिट चित्रपट दिले आहे. आता त्याचा ‘सुपर-३०’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.