नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानीच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी
या कार्यक्रमादरम्यान जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय भीम’च्या घोषणा देत भाजपा आणि काँग्रेसविरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळेस, बसपा नेते विजय यादव यांनी व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर कडक शब्दांत हल्लाबोल केला.
‘भाजपावाल्यांना पळवून पळवून मारणार’, असे विधान विजय यादव यांनी केले. पुढे काँग्रेसला टार्गेट करत ते म्हणाले की, ”काँग्रेस पार्टीनं चार गांधी दिले…इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. भाजपानं काय दिलं, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानीच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी.”
ते इथेच थांबले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना यादव म्हणाले की, ‘नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्योगपतींसाठीच काम केले आहे. गरीबांसाठी काहीच केले नाही. आगामी काळात निवडणुका होणार आहेत. अजून लढाई बाकी आहे. त्यामुळे घाबरू नका. या भारतीय जनता पार्टीवाल्यांना पळवून पळवून मारणार. ‘ यानंतर भाजपावर टीका करताना यादव यांच्या भाषेची पातळी अधिकच घसरल्याचे दिसले. ‘आता यांना (भाजपाला) आपली मेलेली आजी आठवेल. कारण सपा-बसपा एकत्र झाले आहेत. सपा-बसपाला एकाच व्यासपीठावर पाहून सर्वजण बेशुद्ध होतील’, असं यादव म्हणालेत.
बसपाच्या या अतिउत्साही नेत्याने केलेल्या भाषणाचे व्हिडीओ तर व्हायरल होतच आहेत पण राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे.