…मग स्वच्छ भारत अभियानाचे काय ? ; भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

खेड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे सरकार बदलण्याचा निर्धार घेऊन पक्षाची परिवर्तनयात्रा सुरु केली. दुसऱ्यादिवशीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्साहात सभा घेतली. खेड येथील सभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगळ भुजबळ यांनी भाजप सरकारवर प्रश्नांचा भडीमार करत टीक केली आहे.

ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे अनेक बालकांचा म्रुत्यु झाला आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांननी हे नाकारलं आणि ऑक्सिजन मुळे नाही तर अस्वच्छतेमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावर असं असेल तर मगहग स्वच्छ भारत अभियानाच काय?, असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.

देशात नोटबंदी आली आणि रिझर्व्ह बँक खड्ड्यात गेली, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. त्यासोबतच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या सततच्या बदलीवरूनही सरकारवर टीका केली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रामराजन सोडून गेले, उर्जित पटेल गेले. आता सरकारने अर्थतज्ञ बसवण्याच्या जागेवर इतिहासतज्ञाला बसवले. देशाचा कारभार कसा चालवायचा हेच यांना कळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.