मुख्यमंत्र्यांच्या मोबाइलचे नेटवर्क गूल… पोलिसांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना मध्यरात्री उचलून नेले  

रांची – वृत्तसंस्था – आजकाल मोबाईल ही माणसाची अत्यावश्यक गरज बनली आहे. याच मोबाइल मध्ये नेटवर्क नसेल तर माणसं अस्वस्थ होऊन जातात. जर महत्वाचं काम चालू असताना अचानक नेट गेलं तर.. असाच अनुभव झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांना आला. राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क न मिळाल्याने तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या घटनेचा विरोधकांनी फॅसिस्ट विचारसरणी म्हणून निषेध केला होता असून सदर प्रकारामुळे बीएसएनएल कर्मचारी संतप्त झाले आहेत.

झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास हे सोमवारी रात्री राजभवनातील जन चौपाल कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्या, मुख्यमंत्र्यांनी मोबाइलला नेटवर्क येत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर तातडीने कार्यरत झालेल्या पोलिसांनी बीएसएनएलच्या दोन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. अखेरीस पहाटे तीन वाजता या अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

विरोधकांनी केला निषेध
केवळ मुख्यमंत्र्यांच्या मोबइलला नेटवर्क आले नाही म्हणून या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. ही बाब मुख्यमंत्र्यांती फॅसिस्ट विचारसरणी अधोरेखित करते.” असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बीएसएनएल कर्मचारी संतप्त झाले आहे. दरम्यान, सीएमओने या घटनेला दुजोरा दिलेला नाही.