दोन दिवसांपूर्वी शिवसेना भाजपाने युती झाल्याचे जाहीर केले. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनावरून शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवसेनेने हटवावी. शिवसेना ही आता कीवसेना’ झाली आहे. आज सगळ्यांत जास्त दुःखी, असहाय व मानसिक धक्क्यात शिवसैनिक आहेत. येणारी निवडणूक मोदी समर्थक व मोदीविरोधक यांच्यामध्ये होणार आहे. भाजप-शिवसेनेची अभद्र युती ही कॉंग्रेस महाआघाडीच्या फायद्याची असणार आहे. मोदीविरोधाचे खोटे मुखवटे गळून पडले, हे चांगले झाले. भाजपचा पराभव करण्याकरिता सर्व जनता एकवटली आहे. त्यामुळे शिवसैनिकही आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करतील. पाच वर्षांतील पापांचा घडा दोन्ही पक्षांना एकत्रितपणे उचलावा लागेल. असे कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर, अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, शिवसेनेला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. सत्तेसाठी लाचार शिवसेनेची अवस्था “वाकला कणा, मोडला बाणा, तरी मला वाघ म्हणा अशी झाली आहे. अशी टीकाही त्यांनी केली.