आम्ही एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राला निर्माण केलं. या देशाला एक अशी घटना दिली, की त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य आणि समानता मिळालं. दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी फार काम झालं नाही, असं मोदी म्हणतात. मी त्यांना सांगू इच्छितो, गांधीजींनी स्वातंत्र्य मिळण्याआधीच दलितांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला होता. आम्ही घटनेची अंमलबजावणी सुरू करताच दलितांना आरक्षण दिलं. त्यांना शिष्यवृत्ती दिली. त्यांच्या प्रगतीसाठी कायदे केले. अस्पृश्यतेविरोधीत कायद्याची निर्मिती केली. यानंतरही तुम्ही आम्हालाच विचारता काय केलं? आम्ही घटनेच्या आधारे देश चालवला. धर्माच्या नावानं देश चालवला नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख आझाद यांनी भाजपावर हल्ला चढवला.
राहुल गांधींच्या सूचनेवरुन आम्ही जमीन अधीग्रहण कायदा केला.आश्वासनं द्यायची आणि मग ती सोयीस्करपणे विसरुन जायची, असं भाजपासारखं राजकारण आम्ही करत नाही. काळ्या पैशाचं काय झालं? रोजगार संधींचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार होतात. त्याचं काय झालं? आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर येताच अवघ्या काही तासांमध्ये आश्वासनांची पूर्तता केली. सध्या आम्ही जाहीरनाम्यावर काम करत आहोत. लवकर तो जनतेसमोर आणू, असं आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं.