पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
महाराष्ट्रात मंत्री म्हणून कार्यरत असताना सन १९७४ ते १९७५ च्या सुमारास भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळेला सरकारने दुष्काळासाठी योजना राबविली होती. शेतात काम करणा-या मजूराला रोजच्या कमाई पेक्षा जास्त पैसे मिळत होते. परंतु त्यातील ५० टक्के लोक ते पैसे व्यसनांसाठी खर्च करीत असल्याचे निदर्शनास आले. गरीबी हटविण्यासाठी त्या सरकारी योजनेचा काहीच उपयोग होत नव्हता. आजही तीच स्थिती देशात दिसते. देशातील ही गरीबी हटविण्यासाठी, देश व्यसनमुक्त करण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहे.
संतांचे हे विचार लोकांपर्यंत पोहचविणा-या आणि कीर्तन प्रवचनातून प्रबोधन करणा-या लोकांची मी ऋणी आहे, असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. संत तुकाराम महाराज सेवा प्रतिष्ठान, पुणे व ह.भ.प. सुमंतजी महाराज नलावडे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा समिती यांच्या वतीने वारकरी संप्रदायातील अध्वर्यु व्यक्तिमत्व, ज्येष्ठ कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प.गुरुवर्य सुमंतजीमहाराज नलावडे (ओतुरकर)यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचेआणि मीराबाई सुमंतमहाराज नलावडे यांचा ७१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कु-हेकर, स्वागताध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, बालयोगी सदानंद महाराज, माजी आमदार उल्हास पवार, शरद सोनावणे, सत्यशील शेरकर, शरद लेंडे, अतुल बेनके, उर्मिला विश्वनाथ कराड, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, संभाजी खोमणे, महेश महाराज नलावडे, प्रा.सागर शेडगे, अनंतबापू सुतार आदी मान्यवर पदाधिकारी, तसेच महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायातील बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
[amazon_link asins=’B079NBHCKM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf3515d4-9a4a-11e8-b6b2-0d9850225463′]
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. परंतु त्यातील ५० टक्के रक्कम व्यसानांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा उपयोग नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी संतांचे विचार महत्वाचे आहेत. संतांचे हे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम सुमंतजी महाराजांसारख्या लोकांनी केले आहे, असे लोक समाजाचा मौल्यवान ठेवा आहे. त्यांचे हे कार्य पुढील पिढीपर्यंत कसे पोहोचवायचे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.