ट्रक – बसच्या अपघातात ८ जण ठार ; संतप्त जमावाने पेटवले १५ ट्रक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात ८ जण ठार तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताच्या घटनेनंतर संतप्त जमावाने तब्बल १५ ट्रक पेटवले आहेत. या धडकेत बसच्या डावीकडील बाजूचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.
बुधवारी सकाळी एसटी बस क्रमांक (एमएच 40, एक्यू-६०३४) एटापल्लीकडून आलापल्लीकडे जात असतांना गुरूपल्ली गावाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या एमएच-३१, सीक्यू-३३८६ ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत ८ जण जागीच ठार झाले असून १० जण गंभीर जखमी तर. ३० जण  किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले असून. ज्या ट्रकने बसला धडक दिली तो ट्रक एका खाण कंपनीचा होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने या मार्गावरील सुमारे १५ ट्रक पेटवून दिले तर ५ ट्रकची तोडफोड केली आहे. मृतांमध्ये ४ शाळकरी मुलां बरोबरच अहेरी वनविभागात कार्यरत क्षेत्रसहायक प्रकाश अंबादे (४८), अहेरी उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत परिचारिका मंजूळा करपाते (४८), न्यायालय कर्मचारी श्यामला डोंगरे वय (४७), अमोल गावंडे (१६) यांचा देखील समावेश आहे.