विठ्ठलाचे भक्त असते तर मुख्यमंत्री पंढरपूरला गेले असते : दिग्विजय सिंग

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाचे भक्त असते. तर ते  पंढरपूरला पूजेसाठी गेले असते.अशा शब्दात काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.तर मराठा आणि धनगर समाजाच्या नाराजीला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b232d739-8e59-11e8-ba21-d192b7d72565′]

यावेळी दिग्विजय सिंग म्हणाले की,आषाढी एकादशीला गेली २७ वर्षांपासून मी पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे.त्या अगोदर पासून पांडुरंगाची पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्याची परंपरा आहे.मात्र यंदा मराठा समाज आणि धनगर समाजाच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यानी पूजेला जाणे टाळले आहे.या समाजाच्या रोषाला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार असून त्यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे सांगितले होते.त्याचे काय झाले.असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जाहिरात