भारताच्या कर्णधाराची तूलना ; पाकिस्तानचा बाबर आझम म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा – पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझम याची पाकिस्तानी माध्यमांमधून भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना केली जात आहे. पण मी विराट कोहलीच्या जवळही नाही, असं स्पष्टीकरण खुद्द बाबर आझम यानं दिलं आहे. तसंच अशाप्रकारची तुलना थांबवण्यात यावी, अशी विनंतही बाबर आझमनं केली आहे. भारताच्या कर्णधारासारख्यं व्हायला, मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं पाकिस्तानचा क्रिकेटर बाबर आझम म्हणाला.

‘लोकं माझी विराट कोहलीशी तुलना करतात, पण तो खूप मोठा खेळाडू आहे. मी सध्या त्याच्या जवळही नाही. मी नुकतीच माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. विराटनं त्याच्या कारकिर्दीत एक टप्पा गाठला आहे,’ अशी प्रतिक्रिया बाबर आझमनं पीएसएलच्या एका कार्यक्रमादरम्यान दिली.

नुकत्याच पारपडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. कसोटी, एकदिवशीआणि टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. पण बाबर आझमनं या दौऱ्यामध्ये शानदार कामगिरी केली. बाबर आझमनं कोसोटी सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या पहिल्या ३ खेळाडूंमध्ये बाबर आझम होता, एकदिवशी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळांडूपैकी एक होता.