सख्खा चुलत भाऊ निघाला पक्का वैरी… शेतकरी भावाच्या विहिरीत टाकले विष

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. मराठवाड्यात तर अधिकच गंभीर परिस्थिती आहे. असे असताना कौटुंबिक वादातून आपल्या सख्ख्या भावाच्या विहिरीतच विष टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील  भानापुर परिसरातील ही घटना आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुलतानपूर येथील शेतकरी गजानन मारोती राजगुरू यांची भानापूर शिवारात शेती आहे. राजगुरु हे आपल्या कुटुंबासोबत शेतातच राहतात. राजकुमार संजाबराव राजगुरू याने शेतातील विहिरीत विष टाकल्याने पाणी लालसर झाले आहे. तसेच विह‍िरीतून उग्र वास येत आहे. विहिरीचे पाणी गजानन राजगुरू यांचे कुटुंबिय पिण्यासाठी वापरते. मात्र, पाणी वापरण्याआधी हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ऐन दुष्काळात अशा पद्धतीने विहिरीतील पाण्यात विष मिसळल्यामुळे या कृत्याबाबत कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.