बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचा वाद मिटला ; आता परस्परातील वाद मिटेल का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद आता अखेरीस संपुष्टत आला आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा वाद सुरु झाला होता. पण आता मात्र उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यातील बाळासाहेबांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला आहे. बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली आहे. हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, असे त्यांनी हायकोर्टाला कळवले आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचे त्यांनी हायकोर्टात सांगितले. याचिका मागे घेतल्याने ठाकरे बंधूंमध्ये बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन सुरु असलेला वाद संपुष्टात आल्याचे दिसते.

२०१९ मध्ये कमळच फुलणार, सी वोटर्स आणि एबीपी माझाचा सर्वे

वाद नेमका काय होता ?
उद्धवने बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली होती. बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव याच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचेही त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे २०११ मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते, असे त्यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितले होते.

जाहिरात

परस्परातील वाद मिटेल का ? 
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने सध्या याबाबत कायदेशीर वाद सुरू झाला होता. हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले होते. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला होता. परंतु मृत्युपत्राला आव्हान देणारी याचिका मागे घेत जयदेव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची संपत्ती उद्धव ठाकरेंना मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे या दोन्ही बंधूंमधील वाद लवकरच संपुष्टात येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात