लग्नानंतर १४ डिसेंबरला अमृतसर येथे रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे. तसंच बॉलिवूडकरांसाठी मुंबईत देखील खास रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे. गिन्नी कपिलची खूप काळजी घेते असं नुकतंच कपिलने एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होत. कपिल शर्मा त्याच्या कॉमेडी विथ कपिल या शो मुळे चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्याच्या या शोला TRP देखील जास्त मिळत होता.
कार्यक्रमाच्या यशामुळे कपिलच्या डोक्यात हवा शिरल्याचं बोललं जात होतं. कपिलच्या मग्रुरी वागण्याचे अनेक प्रकार देखील त्यावेळी समोर आले होते. सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यातील वादहि चव्हाट्यावर आले होते. कपिलशी झालेल्या टोकाच्या भांडणानंतर सुनील ग्रोव्हर शो देखील सोडून गेला होता. सुनील ग्रोव्हरने त्याचा स्वतःचा दुसरा कॉमेडी शो एका वाहिनीवर सुरु केला पण तो पूर्णपणे फ्लॉप गेला. त्यानंतर सुनील ग्रोव्हर पुन्हा कपिलच्या शो मध्ये आला . कपिलचे निर्मात्यांबरोबर देखील वाद झाले होते. या सगळ्यातून कपिलच्या करिअरला उतरती कळा लागली होती. कपिल डिप्रेशन मध्ये गेल्याच्या चर्चा देखील होत्या. शेवटी सलमानखानच्या प्रोडक्शन हाऊस मधून २५ डिसेम्बरला कपिल पुन्हा एकदा कॉमेडी शो घेऊन त्याच्या चाहत्यांसमोर येतोय. सलमान खानच्या मध्यस्थी नंतर कपिल आणि सुनील यांच्यात समझोता होऊन ते पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहेत.