शिक्षिकेचा गळा चिरल्यानंतर प्रियकराने उंदीर मारण्याचे विष पिले

कांचीपूरम : वृत्तसंस्था – प्रेम प्रकरणातून घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या  कुटुंबियांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला त्यानंतर दोन कुटुंबात वाद झाला. सदर वादामुळे टोकाचे पाऊल उचलत प्रियकराने प्रेयसीची गळा चिरला. एस.बालाजी असं या प्रियकराचं नाव असून तो 28 वर्षांचा आहे. कांचीपूरम येथे  तो वास्तव्यास असून तो एका ऑडिट फर्ममध्ये नोकरीला आहे. तर व्ही. भारती असं त्या तरुण प्रेयसीचे नाव असून ती 26 वर्षांची आहे. पीडित तरूणी सध्या जखमी अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तिरुवोत्तीयुर भागातील ही घटना असून  रविवारी रात्री ही घटना घडली.
रविवारी रात्रीच्या सुमारास बालाजी भारतीच्या घरी गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याने लग्नाचा विषय काढला. परंतु  लग्नाच्या विषयावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या भरात बालाजी शुद्ध हरपून बसला आणि त्याने  तिथे ठेवलेला चाकू उचलून भारतीचा गळा कापला इतकेच नाही तर सदर कृत्य केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. बालाजी आणि भारतीचे प्रेमसंबंध आहेत. पण भारतीच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध आहे असे पोलिसांनी सांगितले.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा  भारतीची आजारी आई देखील घरी होती. इतकेच नाही तर  भारतीचा भाऊ लोगेश नुकताच कामावरुन घरी परतला होता. अचानक आईची किंकाळी ऐकू आल्याने भाऊ लोगेश याने आतमध्ये धाव घेतली. त्यावेळी आपली बहीण जमिनीवर पडलेली त्याला दिसली. इतकेच नाही तर बहिणीच्या गळयातून रक्तस्त्राव सुरु होताना त्याला दिसत होता. सदर चित्र पाहून त्याला धक्का बसला, तो पूर्ण हादरून गेला. तरीही स्वत:ला भानावर ठेवत त्याने तात्काळ भारतीला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. एवढेच नाही तर धक्कादायक बाब अशी की, या दरम्यान बालाजीने सुद्धा उंदीर मारण्याचे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याने  तिरुवोत्तीयुर पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले.  आपण विष पिऊन आल्याचे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी बालाजी विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.