प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडचे शुभमंगल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रत्युषा बॅनर्जींचा  बॉयफ्रेंड राहुल राज शर्माने त्याची गर्लफ्रेंड सलोनी शर्मा बरोबर १५ नोव्हेंबरला रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. दोन वर्षांपूर्वी प्रत्युषाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रत्युषा आणि राहुल दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांच्यातील वादामुळेच प्रत्युषाने आत्महत्या केल्याचं बोललं जात. प्रत्युषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. राहुलची जामिनावर सुटका झालीये. आणि दोन वर्षात लगेचच या पठ्यानं स्वतःचा संसार देखील थाटलाय.

कोण होती हि प्रत्युषा बॅनर्जी ?

प्रत्युषाचा जन्म १० आगस्ट १९९१ ला झारखंडच्या जमशेदपूर मध्ये एका बंगाली  फॅमिली मध्ये झाला. . प्रत्युषा बॅनर्जी हिने बालिका वधू या गाजलेल्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.  आणि त्या ,भूमिकेमुळे प्रत्युषा घराघरात पोहचली. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लहानपणापासूनच प्रत्युषाला अभिनयाची आवड होती. शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात ती पुढे असत. शाळेत असतानाच तिने नाटकात काम करायला सुरुवात केली होती. तिच्यातील याचं गुणांमुळे ती छोट्या पडद्यावरची स्टार झाली होती. प्रत्त्युषा उत्तम सिंगर सुद्धा  होती.  तसाच क्लासिकल डान्स देखील ती शिकली होती.

बालिका वधू नंतर प्रत्युषा झलक दिखलाजा आणि बिग बॉस २ या रियालिटी शो मध्ये देखील दिसली. प्रत्युषाला बालिका वधू मध्ये काम करतानाचे दिवसाचे मानधन २५ हजार इतके मिळायचे.

असे बोलले जाते कि प्रत्युषा ज्यावेळी आत्महत्या करत होती त्यावेळी तिने खूप दारू प्यायली होती. प्रत्युषाची मैत्रिण सारा खान हिने राहुलच्या त्रासामुळे प्रत्युषाने २ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा केला होता.

राहुल आणि प्रत्युषा अनेक दिवस रिलेशनशिप मध्ये होते. त्यांच्यात वारंवार वाद देखील होत असतं. प्रत्युषाने आत्महत्या केल्याने छोट्या पडद्यावर खळबळ माजली होती.  अनेक जण प्रत्युषासाठी हळहळले होते. आणि त्यात राहुलने दोन वर्षातच त्याचा संसार थाटला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात.