भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींबद्दल कांबळे यांना विचारले असता त्यांनी सरकार सनदशीर मार्गाने अभिवादन करणाऱ्याच्या पाठीशी असून या अभिवादन सोहळ्यात कोणी गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर शासन करण्यात येईल आहे दिलीप कांबळे म्हणाले.
इंदू मिल वर उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम सुरु आहे. ज्यांना काम चालू असलेले दिसत नाही त्यांनी ते डोळे उघडे करून बघावे असा टोला दिलीप कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. तसेच स्मारकासाठी प्रकाश आंबेडकर काही करू शकले नाहीत म्हणून त्यांनी स्मारकावर टीका करण्याचे काम सुरु केले आहे. स्मारकाच्या कामात आपण काहीच करू शकलो नाही याचे दुःख प्रकाश आंबेडकरांना आहे आणि त्या दुःखातूनच ते स्मारक प्रश्नी सरकार वर टीका करत असतात अशी बोचरी टीका दिलीप कांबळे त्यांनी आंबेडकरांवर केली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु असून या निवडणुकीत भाजप शिवसेना स्वतंत्र लढत असून त्यांना काँग्रेस आघाडीचा सामना करण्याची वेळ आली आहे तर प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप आणि ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षाने एकत्रित येत अहमदनगर महानगरपालिका निवडणूक लढवली आहे. भाजपच्या पालिका सत्तेची स्वप्ने पूर्ण होणार कि अहमदनगर पालिकेत परिवर्तन केले जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हि निवडणूक डोळ्या समोर ठेवूनच कांबळेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर संधान साधले आहे.