राम हे नाव चर्चेत आलं की समजायचं निवडणुका आल्या : अजित पवार 

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी-चिंचवड येथे सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का ? निवडणुकीसाठी हे सर्व सुरु आहे. सत्तेत आल्यावर म्हणणार हा चुनावी जुमला होता. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला. काहीच नियोजन नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
भाजप सरकार बनवाबनवी करत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बाधण्यामागे भाजपाच राजकारण आहे. निवडणूक जवळ आल्यावर राममंदिराचा मुद्दा काढला. समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्या की शिवसेना, भाजपाला राम आठवतो.
राम हे नाव चर्चेत आलं की समजायचं निवडणुका आल्या –
यावेळी पवारांनी सध्या देशामध्ये राम मंदिराबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत बोलताना सांगितले की “आता निवडणुका जवळ आल्याने राम मंदिरचा विषय काढला जात आहे. केवळ समाज दुभागून एका समाजाची मतं मिळवण्यासाठीचा उपद्याप आहे. तिकडे शिवसेना आता अयोध्येला जाणार म्हणे. राम हे नाव चर्चेत आलं की समजायचं निवडणुका आल्या.”
“भाजप-शिवसेनेला राम नाम निवडणुकांच्या वेळीच आठवतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून हे सत्तेत आलेत पण आज यांना ते आठवतात का?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
भाजप राज्यकर्ते हुकूमशाह –
पिंपरीत नेत्यांना मंत्रीपद, महामंडळ याची आमिष दाखवली होती. पण काय मिळालं तुम्हाला दिसतंय. आज पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. त्यावर अजित पवार यांनी टीका केली. हुकूमशाही पध्दतीने भाजप व राज्यकर्ते काम करत आहेत. चंद्रकात पाटील काय म्हणतात. राफेल बाबत सरकार कोर्टाला सांगतय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गुप्तता ठेवण्यात आलीय. म्हणजे हे कोर्टाला सुरक्षा शिकवणार.
प्रकाश आंबेडकरांशी  पुन्हा चर्चेसाठी तयार –
काल राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत ४८ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांवर आघाडीचं एकमत झाले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. अगदी प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काही बोलले असले तरी आम्ही त्यांच्यासोबत पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आत्ता ज्या जागांवर एकमत झालं आहे, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आता ज्या जागांवर एकमत झालंय, त्यापैकी काही जागा आम्ही मित्रपक्षांना देणार आहोत. मनसेला आघाडीत घेणार का? यावर समविचारी पक्ष एकत्र येतील असं सूचक विधान करत कालच्या बैठकीत मनसे बद्दल चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने महाअघाडीत ते नसतील.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युती होणारच – 
मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे गाजर दाखवण्याच काम. जे सत्तेला हपापले आहेत. त्यांना गाजर आहे. भाजप शिवसेनेची आघाडी झाली किंवा नाही तरी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार. गेल्या वेळेस युती नसल्याने त्याची किंमत सर्वाना मोजावी लागली असे अजित पवार म्हणाले.
जाहिरात