राजगुरूनगर : पोलीसनामा ऑनलाईन
विवाहबाह्य संबंध आता अपराध नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळेे विवाहबाह्य संबंध असणाऱ्याचे फावले असून ‘सैराट’ झाल्या सारखे तरुण मुलींना आमिष दाखवून पळून घेऊन जात आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1988d216-c9e9-11e8-906a-bb8239e295b6′]
खेड तालुक्यात दोन मुलांच्या बापाने चक्क २१ वर्षीय मुलीला फुस लावून पळवले असल्यांची घटना घडली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात माझी मुलगी हरवली अशी तक्रार दिली आहे.
विश्रांतवाडी आणि निगडी मध्ये २ युवकांचा खून
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संशयित खेड तालुक्यातील आहे. तो पिडित तरूणीचा नातेवाईक आहे. तो विवाहित असुन त्याला पत्नी व दोन लहान मुले आहे. नातेवाईक असल्याने त्याचे पिडित तरूणीच्या घरी नेहमी जाणे -येणे असायचे. शुक्रवारी (दि. ५ ) दुपारी १ वाजता घरातील आईवडील शेतावर गेले असता पिडित तरूणी घरी एकटीच असताना संशयिताने लग्न करण्याचे अमिष दाखवून पत्नी व (दोन लहान मुले) असुनही पिडित तरूणीला फुस लावून पळवून नेले. याबाबत तरूणीच्या आईने खेड पोलिस तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस पीडित मुलीचा शोध घेत आहेत.
[amazon_link asins=’B00186L9X2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’22ad8441-c9e9-11e8-8eb4-870427057172′]