राज्यात ‘हा’ पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही : खा. राजू शेट्टी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणार असून, खोटी आश्वासन देवून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे भाजपचे कमळ राज्यात औषधालाही शिल्लक राहणार नाही. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांनी भाजपवर केली.

पाथर्डी तालूक्यातील खोजेवाडी येथे स्वाभिमानीचे तालूका अध्यक्ष शरद मरकड यांनी लोकसहभागातून सुरु केलेल्या राज्यातील पहिल्या जनावरांच्या छावणीला खा शेट्टी यांनी भेट दिली.

राष्ट्रवादीचा ‘तो’ सदस्य ४ जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार ! 

यावेळी स्वाभिमानीचे ज्येष्ठनेते दशरथ सावंत, जिल्हाध्यक्ष सुनिल लोंढे, रवी मोरे, दत्ता फुंदे, संतोष गायकवाड, हंसराज वडगुले, संतोष आहेर, डॉ.कृषीराज टकले, संदीप राजळे, भानूदास गर्जे, माऊली वराडे, वसंत मरकड, सत्यवान बबन बर्डे, राजेंद्र बर्डे, नानासाहेब भगत, युवा नेते बाबासाहेब बुधवंत, स्नेहा भिटे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा.शेट्टी यांनी छावणीमध्ये फेरफटका मारत सत्ताधाऱ्याबरोबरच विरोधी काँग्रेस राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यात विरोधक कमी पडले. सीबीआय आणि ईडी या सरकारच्या दोन हस्तकांपुढे विरोध करणारे विरोधक घायाळ झाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने सत्तेची मस्ती वाढली आणि शेतकऱ्यांना सन २०१४ च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पायदळी तुडवली गेली. मात्र यापुढील निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यात दिलेली आश्वासन न पाळणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द होणार असल्याने खोट बोलणाऱ्या नेत्याला व त्याच्या पक्षाला यापुढे घरी बसावे लागणार असल्याचे देखील ते म्हणाले.

माळावर जावून बोंबलायला पाटलाची गरज लागत नाही त्या पध्दतीन दुष्काळ जाहीर केलाय. परंतु अडीच महिने झाले उपाययोजना काहीच नाहीत. या सरकारला शेतकऱ्यांचे काहीच देणघेण नाही. असे म्हणत शरद मरकड सारखा कार्यकर्ता माझ्या पक्षाला लाभला सरकार मदत करो अथवा ना करो आणखी सहा सात महिने ही छावणी चालवून शेतकऱ्यांचे पशुधन जगवणारच. असा विश्वास खा.शेट्टी यांनी यावेळी दिला.