गेले अनेक वर्षं रिझर्व्ह बँक रेपो रेट आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावानुसार ठरवण्यावर चर्चा करत आहे. बाजारभाव वाढले की बँकांचे व्याजदर वाढतात. पण बाजारभाव घटले की व्याजदर कमी होत नाही किंवा बँका बाजारभाव किंवा गृहव्यवहारासंबंधी कोणतचं मापक वापरात नाही.
काय होणार परिणाम
* बाजारभावांचा व्याजदरांसाठी निकष वापर केल्यास व्यवहारात पारदर्शकता येईल.
* बाजाराचा कानोसा घेऊन राष्ट्रीयकृत बँकांना ग्राहकांसाठी व्याजदरांची आखणी करता येईल.
दरम्यान , जनकराज समितीने काही वर्षांपूर्वी हे पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला होता. हे पाऊलं उचलण्यासाठी बँकांना त्यांच्या कर्जविषयक धोरणांमध्ये थोडे बदल करावे लागणार आहे. येत्या चार महिन्यात हे बदल करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिली आहे.