बॉलिवूडचा दबंग सलमान का आहे चिंताग्रस्त ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – बॉलिवूडचा दबंग नायक सलमान खान सध्या आगामी ‘भारत ‘ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या  कामात व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही जोडी पहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोघांचे चाहते या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत . या चित्रपटाच्या बाबतीतील एका गोष्टीमुळे मात्र सलमान खानची चिंता वाढली आहे.
सलमान का चिंतेत ?

‘भारत ‘ चित्रपटाची लांबी बनलीय सलमानच्या चिंतेचे कारण . ‘भारत’ चित्रपट तीन तासांहून अधिक लांबीचा होणार असल्याचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना वाटते. मात्र, हा चित्रपट पावणे तीन तासांच्या आत बनवला जावा अशी सलमानची इच्छा आहे. त्यात अली अब्बास जफर मात्र कुठल्याही स्थितीत चित्रपटाच्या कथेबद्दल तडजोड करायला तयार नाहीत. चित्रपटाची लांबी वाढेल, या चिंतेत कोणतीही काटछाट करायला ते तयार नाहीत. आता सलमान आणि अली अब्बास याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

‘भारत’ चित्रपटाचा बराचसा भाग ‘माल्टा’ या सुंदर ठिकाणी चित्रीत करण्यात आला आहे. तर ‘अबूधाबी’ येथेही या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले. अली अब्बास जफरचा ‘भारत’ हा सलमानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांचे ‘सुलतान’ व ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. ‘भारत’ या चित्रपटात कॅटरिनाशिवाय तब्बू आणि दिशा पटानी या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जूनला प्रदर्शित होणार आहे.