त्यावेळी ॲड. यज्ञेश्वर,प्रशांत संदानशिव अशांनी त्यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते दोघे शिवीगाळ करुन अरेरावीची भाषा करुन बाहेर निघुन गेले. त्यांनतर श्री कलकर्णी यांचे न्यायकक्षेत जावून सदर घटनेबाबत त्यांना माहीती दिली. त्यावेळी त्यांनी कोर्ट केस वॉच विनोद धनगर यांना बोलावून त्यादोघांना समज देण्याविषीयी सांगुन कोर्टच्या बाहेर जाण्याचे सांगितले.
ते कोर्ट बाहेर गेल्यानंतर इतर वकिल बांधवासोबत वकिल कक्षेत जाऊन त्यांना धुळे येथे काम असल्याने ते धुळे जाण्यासाठी दुपारी ०२.३० वाजेच्या सुमारास कोर्ट आवारात लावलेल्या त्यांच्या कार मध्ये बॅग ठेवत कारचा दरवाजा उघडत असतांना सिमा पाटील व विजय अमृत पाटील व इतर लोक तेथे आले व त्यांनी शिवीगाळ करत ॲड.दिनेश पाटील यांना ओढले व त्यावेळेस विजय अमृत पाटील याने लाथाबुक्कांनी मारहाण केली.
त्यानंतर न्यायालयाचे आवारात लावलेल्या झाडाच्या जवळील लाकडी काठी काढून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर मारणार करणार तोच डावा हात वर करुन काठीचा वार वाचविला. त्यावेळी डाव्या हाताचे कोपऱ्या जवळील हाडावर मार लागला व विजय अमृत पाटील याने गळ्यातील सोन्याची १५ ग्रम वजनाची चैन हि खेचुन घेतली. त्यावेळेस हजर असलेले ॲड यज्ञेश्वर पांडुरंग पाटील, प्रशांत संदानशिव ,ॲड विनायक वाघ ,ॲड मयुर अफुवाले, ॲड. जगदिश बड्गुजर अशांनी त्यांना त्यांचे तावडीतुन सोडले.
कायद्याचं बोलणाऱ्या तुकाराम मुंडेंना नाशिक महापालिकेने शिकवला ‘हा’ नियम