शरत कुमार म्हणाले की, मंदिर ट्रस्टचे बहुसंख्य विश्वस्त ज्येष्ठ साधू गुरुस्वामी यांचे पाठीराखे आहेत. कनिष्ठ स्वामी देवण्णा याचे केवळ मंदिर ट्रस्टचाच नव्हे तर सलूर मठाचाही अध्यक्ष होण्याचे मनसुबे होते; पण विश्वस्त गुरुस्वामींच्या विश्वासातील असल्याने त्याचा या वरिष्ठ स्वामींवर राग होता. त्यामुळे त्याने त्यांना बदनाम करण्याचे हे कारस्थान रचले.
ट्रस्टकडे पुरेसे पैसे नसूनही देवण्णाने मंदिराच्या समोर नवे गोपूर बांधण्याची योजना त्यांच्या गळी उतरविली. याच गोपुराच्या भूमिपूजनाच्या धार्मिक कार्यक्रमानंतरच्या प्रसादाच्या जेवणात विषबाधा होऊन १५ भाविक मरण पावले व १०० हून अधिक आजारी पडले. या कार्यक्रमाला त्याने गुरुस्वामींना निमंत्रित केले.
वीरण्णा आंघोळ करून परत येईपर्यंत वीरण्णाने अंबिका, दोयय्या व व मडेशा यांना हाताशी धरून आपले कारस्थान पार पाडले. कोणी पाहत नाही ना याकडे लक्ष ठेवण्याचे काम मडेशाने केले व अंबिका आणि दोदय्या यांनी चुलीवर उकळत असलेल्या टोमॅटोच्या सारामध्ये कीटकनाशक मिसळले.