OMG ! तनुश्रीने दिला ‘या’ पाच कलाकारांना शाप म्हणाली तुमच्या…  

मुंबई : वृत्तसंस्था – काही दिवसापूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा आपल्या स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. या स्टेटमेंटमधून तनुश्रीने नाना पाटेकर ,राकेश सारंग, सामी सिद्दीकी आणि गणेश आचार्य यांच्यावर निशाणा साधला आहे. माझा शाप तुम्हाला भोवणार आणि तुमच्या जवळच्या सर्वांना हा शाप लागणार. कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही, असा शाप तिने या सगळ्यांना दिला आहे.

तिच्या स्टेटमेंटमध्ये पुढे ती म्हणाली, मी माझ्या मनातून, आत्म्यातून राखी सावंत, गणेश आचार्य, नाना पाटेकर, राकेश सारंग आणि निर्माता सामी सिद्दीकीला शाप देते. तुमच्या जवळच्या सर्वांना हा शाप भोगावा लागेल. तुमची मुले आणि त्यांची मुले सगळयांच तोच मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागेल, जो मी आणि  माझ्या कुटुंबाने सहन केला. माझे शब्द लक्षात ठेवा. तुमचे मुलंही  माझ्यासारखेच अश्रू गाळत बसणार. माझा अपमान करणाऱ्या प्रत्येकाला हा शाप लागणार. कुठलाही पंडित, पुजारी तुमची या शापातून मुक्तता करू शकणार नाही. कुठला देव ही तुमच्या मदतीला येणार नाही. योग्य वेळ आली की, देवही तुम्हाला तुमच्या दुष्कर्माची शिक्षा देईल.

पुढे तिने असेही सांगितले,  ‘हॉर्न ओके प्लीजच्या गाण्यासाठी मीच गणेश आचार्यच्या नावाची शिफारस केली होती. पण त्यावेळी त्यानेही माझी  मदत केली नाही. फक्त एका व्यक्तिने नाही तर सेटवर हजर असलेल्या चार लोकांनी माझे शोषण केले. मी तेव्हा फक्त २४ वर्षांची होते. आणि बॉलिवूडमध्ये करियर बणवण्याची माझी इच्छा होती. पण या घटनेनंतर  गणेश आचार्यने माझ्याबद्दल मीडियात खोट्या गोष्टी पसरवल्या आणि माझे करिअर संपवले. राखी सावंत माझ्याबद्दल अपमानास्पद बोलली. यामागेही गणेश आचार्य सूत्रधार आहे. १० वर्षांपूर्वी आणि आता अलीकडे सहा महिन्यांपूर्वी भारतात असताना इतका अपमान सहन करूनही मी जिवंत कशी, याचेच आश्चर्य वाटते.